वर्षांचा प्रदीर्घ वारसा
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना २४ मे १९५७ रोजी झाली असून, ५ डिसेंबर १९५७ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष कै. रामलाल सुरैय्या यांच्या हस्ते बँकेचे उद्घाटन झाले. जिल्हा विभाजनानंतर १ जुलै १९८३ रोजी बँकेची पुनर्स्थापना (नोंदणी क्र. १४२७) करण्यात आली. रिझर्व बँकेने १९९५ मध्ये व्यवसायास मान्यता दिली, ज्याचे नूतनीकरण २०११ मध्ये करण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीवरील प्रमुख व्यवसाय असलेल्या मासेमारीला सक्षम करण्यासाठी बँक मच्छिमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा, काजू, फणस, नारळ आणि कोकम यांसारख्या "कोकणी मेव्यावर" जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. भात आणि नाचणी ही येथील प्रमुख पिके असून, आंबा व काजू प्रक्रिया उद्योगांचा जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा आहे. बँक या शेती आधारित उद्योगांना निरंतर अर्थबळ पुरवते.
बँकेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या ९ तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, औषधी वनस्पती आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेले निसर्गरम्य वातावरण जिल्ह्याला एक वेगळी ओळख प्रदान करते.
रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात एक आधुनिक, तंत्रज्ञानस्नेही आणि सुरक्षित बँक म्हणून नावारूपास येणे.
आम्ही अशा प्रगत भविष्याचे स्वप्न पाहतो, जिथे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आधुनिक डिजिटल बँकिंग प्रवाहाशी पूर्णपणे जोडलेला असेल. तंत्रज्ञानाच्या या युगात, प्रत्येक हाताला बँकेचे सुरक्षित पाठबळ मिळावे आणि त्यातून सर्वांगीण आर्थिक समृद्धी साध्य व्हावी, हेच आमचे ध्येय आहे. केवळ सेवा पुरवणे नव्हे, तर डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू भागीदार होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पारदर्शक सेवांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेती, मासेमारी आणि स्थानिक उद्योगांना सक्षम करणे.
प्रामाणिक आणि आधुनिक बँकिंगच्या माध्यमातून रत्नागिरीतील प्रत्येक व्यक्तीचे जीवन समृद्ध करणारी सर्वात विश्वासार्ह बँक बनणे, हे आमचे ध्येय आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे आणि प्रत्येक स्थानिक व्यावसायिकाला प्रगतीसाठी भक्कम पाठबळ मिळावे, असे भविष्य आम्ही घडवू इच्छितो. आमच्या पारंपरिक मूल्यांची आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून, आमच्या लोकांसाठी सर्वोत्तम बँक आणि जिल्ह्याच्या प्रगतीचा आधारस्तंभ बनण्याचे आमचे लक्ष्य आहे.
अध्यक्ष
उपाध्यक्ष